शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दाहिनी स्मशानभूमीत दाखल उद्यापासून जोडकाम सुरू ,जानेवारीपासून दाहिनी कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:44 IST

\कोल्हापूर : नेहमी प्रागतिक विचारसरणीचा स्वीकार करणाºया कोल्हापूर शहरात लवकरच येथील पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा वापर सुरू होणार

कोल्हापूर : नेहमी प्रागतिक विचारसरणीचा स्वीकार करणाºया कोल्हापूर शहरात लवकरच येथील पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा वापर सुरू होणार आहे. सध्याच्या प्रचलित शेणी व लाकडांच्या पारंपरिक पद्धतीमुळे अंत्यसंस्कारास लागणारा वेळ, होणारे प्रदूषण या गोष्टींचा विचार करून ही गॅसदाहिनी बसविण्यात येत असून, विशेष म्हणजे मूळचे कोल्हापूरचे असलेल्या परंतु व्यवसायाच्या निमित्ताने बडोद्यात स्थायिक झालेल्या राजेंद्र चव्हाण यांनी ही दाहिनी मोफत दिली आहे. उद्या, शुक्रवारपासून ही दाहिनी जोडण्याचे काम सुरू होणार आहे.कोल्हापूर शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा स्मशानभूमीत सुविधा कमी पडत आहेत. अपुरे बेड, पार्किंगची गैरसोय यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे विस्तारीकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. याबाबत स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्याचे आदेश आयुक्त अभिजित चौधरी यांनी नुकतेच दिले आहेत.गुजरात राज्यात सगळीकडे स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविल्या गेल्या आहेत. राजेंद्र चव्हाण यांचा बडोद्यात गॅस दाहिनी तयार करण्याचा कारखाना आहे. जवळपास २०० हून अधिक ठिकाणी त्यांनी गॅस दाहिन्या बसविल्या असून त्या उत्तमप्रकारे सुरू आहेत.चव्हाण यांनी अशीच एक गॅस दाहिनी कोल्हापुरात सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु सुरुवातील अधिकाºयांकडून तसेच पदाधिकाºयांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता; परंतु महापौर हसिना फरास, तत्कालिन उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी पुढाकार घेऊन सादरीकरण पाहिले होते. महापालिका सभेत गॅस दाहिनी बसविण्याचा ठरावही झाला आहे.दोनच दिवसांपूर्वी चव्हाण यांनी ही गॅस दाहिनी कोल्हापूरला पाठविली असून ती पंचगंगा स्मशानभूमीत पूर्वी डिझेल दाहिनी बसविली होती तेथे ठेवण्यात आली आहे. उद्या, शुक्रवारपासून ही गॅस दाहिनी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी बडोद्याहून तीन कारगीर येत आहेत. जोडकाम तसेच काही सिव्हील काम करण्यासाठी किमान आठ दिवस लागणार आहेत. त्यानंतर इलेक्ट्रीफिकेशनची कामे पूर्ण केली जातील. नवीन वर्षांत ही दाहिनी प्रत्यक्षात सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विस्तारीकरणाची : गरजवाढत्या लोकसंख्येमुळे स्मशानभूमीत सुविधांची वाणवा असून, त्यामुळे नागरिकांना अत्यंसंस्कारावेळी वाट पहावी लागते. गॅसची दाहिनी बसविल्यानंतर ही अनेक कामे तातडीने करणे गरजे आहे. स्मशानभूमीत विकासकामे लवकरात लवकर सुरु करण्याची गरज आहे.